शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लक्ष्मी टेकडी चौक नव्हे ‘मृत्यूचा सापळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:43 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापुरात जसे कोणत्याही भागात गेले तरी वाहतुकीची कोंडी अनुभवास येते तशीच कोंडी शहराची प्रवेशद्वारे असलेल्या प्रत्येक ठिकाणी होत आहे. बेशिस्त वाहनचालक, अस्ताव्यस्त पार्किंग, अनधिकृत टपºयांमुळे कोल्हापुरात प्रवेश करताना मोठी कसरत करावी लागते. शहराचे प्रवेशद्वार कसे असते, त्यावरून शहराबद्दलची प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे या समस्याचा वेध घेणारी व त्यावर उपाय सांगणारी वृत्तमालिका आजपासून...!कोल्हापूर : अपुरे सेवा रस्ते, या रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंग, वाहतुकीला अडथळे ठरणारे बसथांबे, बेशिस्त वाहतूक यांमुळे उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौक (पंचतारांकित औद्योगिक) पर्यंतचा सात किलोमीटरचा मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील या सात किलोमीटरच्या अंतरामध्ये गेल्या वर्षभरात २४ जणांना जिवाला मुकावे लागले आहे.उत्तर आणि दक्षिण भारतामधील रस्ते वाहतुकीचा दुवा असलेल्या, कोल्हापूरला महामार्गाच्या नकाशावर आणणाºया, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींची जीवनवाहिनी असणाºया राष्ट्रीय महामार्गाचे एक वेगळे महत्त्व आहे. या मार्गावरून रोज हजारो वाहनांची दिवस-रात्र ये-जा सुरू असते. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला गती मिळावी, वाहनधारकांच्या वेळेची बचत व्हावी या उद्देशान त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, या उद्देशाच्या उलट स्थिती सध्या या मार्गावर झाली आहे. या मार्गावरील उजळाईवाडी उड्डाणपूल ते लक्ष्मी टेकडी चौकापर्यंतचे अंतर मृत्यूचा सापळा बनला आहे. सात किलोमीटरच्या या मृत्यूच्या सापळ्याची सुरुवात ही कोल्हापूर शहराकडून शाहू नाक्यापासून येणाºया उजळाईवाडी उड्डाणपुलापासून होते. हा पूल महामार्गाच्या उजव्या बाजूपर्यंत बांधल्याने यावरून येणाºया वाहनांना महामार्गावर प्रवेश करताना जीवघेणी कसरत करावी लागते. या पुलावरून येणारी वाहने महामार्गाच्या कागलच्या दिशेने डाव्या बाजूला जाण्याऐवजी थेट महामार्गावर पुण्याकडून येणाºया वाहनांच्या आडवी जातात. या ठिकाणी रस्ता ओलांडण्याचा चुकलेला थोडासा अंदाज मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत आहे. या पुलापासून अर्धा किलोमीटर मयूर पेट्रोल पंपाच्या पूर्व बाजूस असणारे वळण हे महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी न बदलता पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहे. या वळणाच्या आधी दिशादर्शक फलक असूनही ते सहजपणे दिसून येत नाहीत. भरीस भर म्हणून येथे बसथांबा आहे. यामुळे येथे रात्रीच्या वेळेस वाहने उलटून अपघात घडत आहेत. गोकुळ शिरगाव-कणेरी फाटा हा सिद्धगिरी मठ-म्युझिअम, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव, नेर्ली-तामगाव-सांगवडे यांना जोडणारा महत्त्वाचा चौक आहे. या फाट्यावर उड्डाणपूल आहे.औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी अवजड वाहने, एस. टी., बसेस, कारखानदार व कामगारांच्या वाहनांचे प्रमाण लक्षात घेता, हा पूल वाहतुकीस अपुरा ठरत आहे. हा पूल आणि त्यालगतच्या सेवारस्त्यांवर झालेले विविध स्वरूपांतील अतिक्रमण, या रस्त्यांवरच असणारे बसथांबे, अनेकदा रस्त्याच्या मध्येच थांबणारे वडाप यांमुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सकाळी आठ आणि सायंकाळी पाचनंतर येथे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. या गर्दीतून वाट शोधत पुढे सरकणारे दुचाकीधारक, पादचारी, धोकादायकपणे वळण घेणारी अवजड वाहने, मोठ्या आवाजात वाजणारे हॉर्न असा मोठा गजबजाट येथे रोज असतो. यातून वाहन घेऊन जाणे एक दिव्यच ठरते. या फाट्यावर नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. कणेरीवाडी येथे सेवारस्त्यांची उपलब्ध नसल्याने हे ठिकाण धोकादायक बनलेले आहे. लक्ष्मी टेकडी चौक तर या मार्गावरील अपघातांसाठीचा ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे.वाहतुकीला शिस्त नसल्याने येथे वारंवार अपघात घडतात. अवजड वाहनांना दुचाकी, अन्य वाहने धडकून झालेल्या अपघातांत अनेकांचा येथे मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता, महामार्गावरील वाहतुकीबाबतच्या असुविधा, वाहनधारकांचा बेजबाबदारपणा, बेशिस्त वाहतुकीमुळे हे सात किलोमीटरचे अंतर जीवघेणे ठरत आहे. ‘विमा, मेडिक्लेम पॉलिसी असेल तरच या मार्गावरून प्रवास करा,’ असे म्हणण्यासारखे येथील वास्तव आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस